मनमाझे🍂🍂🍁🍁🍁
*कीती रुटीन होऊन जाते ना जगणे आणी जीवन . आलेला गोड कडु प्रसंग मागे टाकून पुढे जगतांना एक सल कायमचा मनांत राहुन जातो . काही तरी चुकले आहे . काही तरी विसरले आहे . कायबरं इतक्यांत नविन विचार त्याची जागाघेतो व प्रबळ होतो . असे मनाचे चक्र सुरू असते . निर्विकार मन कधीकाळी होइल ह्या आशेवर आपले जगणे सोपे करण्यासाठी प्रयत्न सुरू होतात . दोन विचारातील पॉज वाढविण्यासाठी ही मनाचे प्रयत्न सुरू होतात . आपले मन आपल्यालाच उमगत नाही . हे उमगणे जर साध्य झाले तर कीती छान होइल . असे खरे होइल ? * भास्कर पवार 🍀🍀🍀🍀🍀

No comments:
Post a Comment